Get it on Google Play
Download on the App Store

शिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे.

जीवनातील कोणतीही गोष्ट करताना शिवाजी महाराज असा विचार करत असत की , या गोष्टीचा स्वराज्यावर कोणचा परिणाम होईल ? निदान वाईट परिणाम तर होणार नाही ना ? मग ती गोष्ट राजकीय , धार्मिक , आर्थिक किंवा अगदी कौटुंबिकही असो. महाराजांची स्वत:ची एकूण आठ लग्ने झाली. यातील काही लग्ने ही याच विचाराने साजरी झाली की , या विवाहामुळे स्वराज्याच्या सार्मथ्यात काही उपयोगाचे राजकारण किंवा समाजकारण घडणार आहे का ? नाईक-निंबाळकर , राजे महाडिक , राजे जाधवराव , गायकवाड , इंगळे , मोहिते इत्यादी घराण्यातील मुलींशी महाराजांचे विवाह झाले. ही सर्वच घराणी फार मोठ्या मानाची आणि राजकीय महत्त्वाची होती. ही सर्वच घराणी कोणा ना कोणातरी बादशाहाच्या पदरी सरदारी करणारी होती.
त्यामुळे या विवाहसंबंधामुळे ही घराणी केवळ भोसले राजांच्याच नात्यात गुंफिली गेली. स्वराज्याचे हे सर्व सासरे जबरदस्त लष्करी सरदार बनले. नाती गोती जोडतानाही जिजाऊसाहेबांनी आणि शिवाजीराजांनी स्वराज्याच्या हिताचा विचार केला. नवीन पिढीतही महाराजांनी हेच सूत्र कायम ठेवले. कोकणातील शिकेर्राजे , सुवेर्राजे , विचारेराजे या घराण्यांचाही महाराजांनी असाच विचार केला. यावेळी कोकणात डेरवण , गोंडमळा आणि कुटरे या भागात (तालुका चिपळूण) शिकेर्राजांचं घराणं फारच मातब्बर होतं. मंडळी शूर होती. खानदानी वजनदार होती. पण शिकेर्राजे आदिलशाह बादशाहाच्या पदरी कदीम इज्जतआसार सरदार होते. दाभोळचे वतन वा जहागिरी बादशाहानं शिर्क्यांना बहाल केलेली होती. शिर्क्यांच्यासारखं मातब्बर घराणं स्वराज्याच्या कामात सामील झालं पाहिजे हा विचार महाराजांच्या मनांत सतत वावरत होता.

अन् एक दिवस महाराजांनी आपल्या थोरामोठ्या अधिकाऱ्यांच्या मार्फत हा आपला विचार लग्नसंबंध घडवून आणण्याच्या निमित्ताने बोलून दाखवला. त्यावेळी शिकेर् घराण्यातील प्रमुख आसामी होती पिलाजीराजे शिकेर्. पिलाजीराजांना गणोजीराजे या नावाचा मुलगा आणि जिऊबाई (उर्फ येसूबाई) ही मुलगी होती. महाराजांच्या मनांत साटंलोटंच करावं असं आलं. म्हणजे आपली मुलगी राजकँुवर उर्फ नानीसाहेब ही शिर्क्यांच्या गणोजीराजांना द्यावी आणि त्यांची मुलगी येसूबाई ही आपल्या संभाजीराजांना करून घ्यावी असं हे साटंलोटं करावं हा विचार महाराजांनी केला. नातेही जुळेल आणि राजकीय संबंधही जुळून येऊन कदाचित शिकेर्राजे हे आपल्या साऱ्या परिवारानिशी स्वराज्याच्या कामांत सामील होतील. ही अपेक्षा त्यांच्या मनी आली. पण यात एक फार मोठा अवघड असा पेच होता. तो म्हणजे शिर्क्यांच्या जहागिरी वतनाचा. ही त्यांची जहागीर कोकणातच होती. ती आदिलशाहीकडून त्यांना पिढीजात होती. शिकेर्राजे आणि भोसलेराजे यांचे नाते जमण्यात फारसा अवघड पेच येणार नाही. पण शिकेर्राजे स्वराज्यात येतील की नाही ही मात्र शंका होती.

अन् महाराजांनी लग्नाची बोलणी शिर्क्यांशी सुरू केली. नात्याने शिकेर् भोसले सोयरे झाले. लग्ने थाटात झाली. महाराजांची लेक शिर्क्यांची सून झाली. त्यांची लेक येसूबाई महाराजांची सून झाली.

चार दिवस उलटले. अन् महाराजांनी आपल्या मनीचे गूज पिलाजीराजे शिकेर् यांना बोलून दाखवले , की शिकेर् मंडळींनी स्वराज्याच्या सेवेत यावे. सवय लागलेली बादशाही सेवा सोडून इकडे येणे अवघडच होते. पण त्यालाही पिलाजीराजे शिकेर् यांनी मान्यता दिली. आनंदच कलमी आंब्यासारखा मोहरला.

पण यात सर्वात मोठा अवघड भाग होता. तो म्हणजे स्वराज्यात विलीन व्हावे लागणार होते. शिकेर् जहागिरी स्वराज्यात पूर्णपणे देऊन टाकावी लागणार होती. आणि शिकेर् हे स्वराज्याचे , त्यांच्या योग्यतेप्रमाणेच पण स्वराज्याचे पगारी नोकर बनणार होते. असे हे अवघड दुखणे न कण्हता सोसणे शिर्क्यांना जड जाणार होते. पण महाराजांच्या प्रभावामुळे म्हणा की शिर्क्यांच्या मनांत उदात्त भाव निर्माण झाल्यामुळे म्हणा , पिलाजीराजे शिकेर् यांनी आपले दाभोळचे आणि इतर काही असलेले बादशाही वतन स्वराज्यात विलीन करण्यास मान्यता दिली. खरोखर अतिशय आनंदाची पण तेवढीच थक्क करणारी गोष्ट होती. सर्वात सुखावले स्वत: शिवाजीमहाराज कारण स्वराज्यात कुणालाही जहागिरदारी वा सरंजामी वतने न देण्याचा अत्युत्कृष्ट रिवाज , अगदी पहिल्या दिवसापासून महाराजांनीच चालू ठेवला होता.

शिर्क्यांचे शाही वतनदारी जीवनच बदलले. ते स्वराज्याचे शिलेदार आणि पगारी सरदार झाले.

चार दिवस उलटले. लग्नात अगदी छोटी छोटी असलेली मुले हळूहळू मोठी होऊ लागली. अन् पिलाजीराजे शिर्क्यांच्या मनात नकळत मोहाचं मोहोळ जमा होऊ लागलं. त्यांना आपल्या बादशाही वतनाची घडीघडी आठवण होऊ लागली. अन् एक दिवस तर त्यांना वाटू लागलं की , आपले स्वराज्यात विलीन झालेले दाभोळचे वतन आपलं आपल्याला हवंच. इतर कोणाला महाराज वतने देत नसतील , तरी व्याही या नात्यानं महाराजांनी आपलं पूर्वापार वतन आपल्याला द्यावंच.

हा विचार स्वराज्याच्या दृष्टीने घातकी होता. नव्हे , विषारी होता. कारण एकदा ही स्वराज्याची सरंजामशाहीमुळे तबीयत बिघडली , तर स्वराज्याला क्षयासारखा रोग जडेल. अन् एक दिवस हे स्वराज्य स्वार्थात बुजबुजून कोणाच्यातरी म्हणजे वतनदारी देणाऱ्या कोणा परक्याच्याही गुलामगिरीत पडेल.

अगदी शेवटी इंग्रज आले तेव्हा पेशवाईचे असेच झाले ना ? शिंदे , होळकर , गायकवाड , नागपूरकर भोसले , पटवर्धन आणि असंख्य लहानमोठे स्वराज्याचे सेवक आपल्या सरंजामी स्वार्थाकरिता इंग्रजांचे गुलाम बनलेच ना! हे ते विष होते. वतनदार हे तो राज्याचे दायाद. म्हणजे भाऊबंद. ते भाऊबंदकीच करणार. अन् स्वराज्य मात्र मरणार.

महाराजांनी उगवतीपासून मावळतीपर्यंत सारा विचार तोरणा काबीज केल्यापासूनच निश्चित ठरवलेला होता , की कोणास वतन , सरंजाम देणे नाही.

अन् आता तर शिकेर् राजांच्या मनांत हाच विचार आला आणि पिलाजीराजे शिकेर् यांनी महाराजांकडे पत्र पाठवून ‘ आमचे दाभोळचे सरंजामी वतन आमचे आम्हांस मिळावे ‘ अशी उघडउघड मागणीच केली आता!

व्याह्यांच्या या मागणीने महारज हादरले. धर्मसंकटच उभे राहिले. व्याह्यांना वतन द्यावे , तर आपल्या सर्व सरदारांवर त्याचा काय परिणाम होईल ? न द्यावे तर शिकेर् नाराज होतील रागावतील. संतापतील. अपमान मानतील आणि पुन्हा बादशाहाला जाऊन सामील होतील. कुणी सांगावं काय होईल ते!

महाराज चिंतेत पडले. अन् त्यांच्या मनांत एक धूर्त सोंगटी अडीच घरं तिरपी सरकली. त्यांनी पिलाजीराजांना पत्र लिहून कळवले. पत्र छान लिहिले. पत्रांत म्हटलं , ‘ दाभोळचे तुमचे अमानत ( म्हणजे स्वराज्यात विलीन झालेले) झालेले वतन तुम्हांस परत द्यावे ऐसे आमचे ठरले आहे. आमची लेक तुम्हां घरी दिली. तिला पुत्र झाल्यावरी त्याचे नावाने हे वतन द्यावे ऐसे आमचे ठरले आहे.

म्हणजे त्या लेकीला ( तिचे नांव राजकुँवर नानीसाहेब) पुढे मोठी झाल्यावर जेव्हा केव्हा पुत्र होईल , तेव्हा पाहता येईल!

शिकेर्राजेही जरा नाराजले. पण पुढे नक्की आपल्याला दाभोळ परत मिळणार या समाधानात सुखावले. लौकर नातू जन्माला येवो , हीच अपेक्षा राजांच्या मनांत दरवळत राहिली.

पण महाराजांनी मात्र कुणालाही सरंजाम न देण्याचा आपला राज्यकल्याणकारी हेतू ढळू दिला नाही.
-बाबासाहेब पुरंदरे

राजे शिवछत्रपती Shivaji Maharaj

गणेश पावले
Chapters
ते आम्ही---! शिवकालीन दिनविशेष छातीठोक काव्य.. गर्व बाळगा वाचताना. शिवचरित्रमाला भाग १ अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं! शिवचरित्रमाला भाग २ संजीवनी लाभू लागली… शिवचरित्रमाला भाग ३ स्वराज्य हवे की बाप हवा? शिवचरित्रमाला भाग ४ झडप बहिरी ससाण्याची… शिवचरित्रमाला भाग ५ यह तो पत्थरों की बौछार है! शिवचरित्रमाला भाग ६ तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला! शिवचरित्रमाला भाग ७ तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ! शिवचरित्रमाला भाग ८ ‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस!’ शिवचरित्रमाला भाग ९ चंदग्रहण शिवचरित्रमाला भाग १० क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते. शिवचरित्रमाला भाग ११ राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे! शिवचरित्रमाला भाग १२ पुढचे पाऊल पुढेच पडेल. शिवचरित्रमाला भाग १३ आलं उधाण दर्याला. शिवचरित्रमाला भाग १४ मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला शिवचरित्रमाला भाग १५ कठीण नाही ते व्रत कसलं? शिवचरित्रमाला भाग १६ हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे शिवचरित्रमाला भाग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव. शिवचरित्रमाला भाग १८ सश्रद्ध, पण सावधान असावे! शिवचरित्रमाला भाग १९ आकांक्षांना पंख विजेचे. शिवचरित्रमाला २० आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही. शिवचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग! शिवचरित्रमाला भाग २२ अजगरांचे विळखे. शिवचरित्रमाला भाग २३ शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती. शिवचरित्रमाला भाग २४ अवघे मराठेच! तलहातावरी सीर घेऊनी झुंजले. शिवचरित्रमाला भाग २५ तुका म्हणे येथे… येऱ्या गबाळ्याचे काम नोहे. शिवचरित्रमाला भाग २६ एक भीषण गनिमी कावा शिवचरित्रमाला भाग २७ शब्दांविना गर्जे आमुचा दरारा! शिवचरित्रमाला भाग २८ त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा. शिवचरित्रमाला भाग २९ ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते. शिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ. शिवचरित्रमाला भाग ३१ हौसेने स्वराज्य सजवावे. शिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत. शिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा. शिवचरित्रमाला भाग ३४ लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच. शिवचरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर. शिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा…….. शिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा. शिवचरित्रमाला भाग ३८ मराठी हेरांचे ‘गुप्त’ योगदान! शिवचरित्रमाला भाग ३९ शत्रूच्या वर्मावरती घाव. शिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर. शिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे शिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण. शिवचरित्रमाला भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील. शिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी! झेड सिक्युरिटी! शिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत. शिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत शिवचरित्रमाला भाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते शिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही. शिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही. शिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ शिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा. शिवचरित्रमाला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक. शिवचरित्रमाला भाग ५३ एक दिव्य, तेवढेच दाहक तेज… शिवचरित्रमाला भाग ५४ राजकारण आणि रणांगण विवेकी असावे शिवचरित्रमाला भाग ५५ पुरंदरचा तह शिवचरित्रमाला भाग ५६ राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच शिवचरित्रमाला भाग ५७ एक फसलेला डाव शिवचरित्रमाला भाग ५८ दोन महत्त्वाकांक्षांचे घडणारे दर्शन शिवचरित्रमाला भाग ५९ आग्रा किल्ल्यात प्रवेश शिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली… शिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर… शिवचरित्रमाला भाग ६२ खैबरखिंडीच्या जबड्यात? शिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लावलेले शाही कारस्थान शिवचरित्रमाला भाग ६४ हा बुद्धिबळाचाच डाव शिवचरित्रमाला भाग ६५ मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था. शिवचरित्रमाला भाग ६६ राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे शिवचरित्रमाला भाग ६७ धाडसी कल्पकतेची झेप शिवचरित्रमाला भाग ६८ ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच शिवचरित्रमाला भाग ६९ रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले शिवचरित्रमाला भाग ७० राजाची आई ती प्रजेचीही आईच शिवचरित्रमाला भाग ७१ आग्र्यानंतरचे राजकारण शिवचरित्रमाला भाग ७२ पाखरे परतली शिवचरित्रमाला भाग ७३ सुसंस्कृत राजाचे दर्शन शिवचरित्रमाला भाग ७४ ही राजनीती साऱ्याच आलमगीरांची होती… शिवचरित्रमाला भाग ७५ कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड शिवचरित्रमाला भाग ७६ आता लक्ष पोर्तुगीजांवर शिवचरित्रमाला भाग ७७ एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त शिवचरित्रमाला भाग ७८ जंजिरे सिंधुदुर्गाची वास्तुशांत शिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ शिवचरित्रमाला भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी शिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला शिवचरित्रमाला भाग ८२ बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ शिवचरित्रमाला भाग ८३ चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र शिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर शिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र शिवचरित्रमाला भाग ८६ जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात शिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान शिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये शिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान शिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका शिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार शिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड शिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी शिवचरित्रमाला भाग ९४ गडाचा कडा? नव्हे, यमराजाची पाठच! शिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा शिवचरित्रमाला भाग ९६ राजमाता – एक समर्थ नेतृत्व शिवचरित्रमाला भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती शिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र शिवचरित्रमाला भाग ९९ शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य शिवचरित्रमाला भाग १०० एका बुंदेला राजपुताची गरुडझेप शिवचरित्रमाला भाग १०१ एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली. शिवचरित्रमाला भाग १०२ गजान्तलक्ष्मीचे कारंजे. शिवचरित्रमाला भाग १०३ दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा. शिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा. शिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन शिवचरित्रमाला भाग १०६ मोगल आणि मराठे यांच्या यशापयशाचा अभ्यास. शिवचरित्रमाला भाग १०७ पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना शिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच शिवचरित्रमाला भाग १०९ पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा. शिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा. शिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे. शिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते फक्त मराठ्यांच्या तलवारीतच. शिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा . शिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले… शिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान. शिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे. शिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक. शिवचरित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्तीचा आसूड. शिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना . शिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती. शिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी. शिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर. शिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे. शिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास . शिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा. शिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक. शिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ. शिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस. शिवचरित्रमाला भाग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते. शिवचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे. शिवचरित्रमाला भाग १३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही शिवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे. शिवचरित्रमाला भाग १३३ शिवस्पर्श शिवचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती शिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान. शिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व शिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर! शिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे? शिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी. शिवचरित्रमाला भाग-१४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी शिवचरित्रमाला भाग- १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय शिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास शिवचरित्रमाला भाग – १४३ रायगड राजसाज सजला शिवचरित्रमाला भाग- १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला शिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा शिवचरित्रमाला भाग- १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले! शिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’ शिवचरित्रमाला भाग – १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा शिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान! शिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत !