Get it on Google Play
Download on the App Store

इच्छापूर्ती मयुरेश्वर, मोरगाव

मोरगावचा मोरया मयुरेश्वर हा अष्टविनायकांपैकी एक . पहिलाच गणपती . हा मोरया मनी इच्छिलेले लगेच देतो असा अनुभव आहे. ... त्याबद्दलची आजची ही छोटीशी कथा ... गणपतीबुवा म्हसकर हे कोकणातील शिरगावचे राहणारे , घरात लहानपणापासून अठरा विसवे दारिद्र्य . काही वेळा तर घरात अक्षरशः फुटकी दमडीही नसे . लहानपणी गणपतीबुवानी पुढील श्लोक पाठ केला होता , " कऱ्हेच्या तीरी एकसे मोरगाव | तिथे नांदतो पहा मोरया देव | चला जाऊ यात्रे महापुण्य आहे | मनी इच्छिले मोरया देत आहे || " मोरगावचा हा मोरया जर मनात इच्छिलेले सर्व देतो तर आपण एकवार मोरगावला जाऊन त्याला दारिद्र्य दूर करण्याबद्दल सांगायला काय हरकत आहे , असा विचार करून गणपतीबुवा मोरगावचा पत्ता शोधीत शोधीत एकदाचे खरोखरच मोरगावला येउन पोहोचले . त्यांनी मोरयाला प्रथम डोळे भरून पाहून घेतले आणि बरोबर आणलेले गुळ- शेंगदाणे खाऊन ते ओवरीत स्वस्थ बसून राहिले . त्याच वेळी एक सिद्धपुरुष मोरयाच्या दर्शनासाठी मंदिरात आला होता . दर्शन घेऊन झाल्यावर त्याचे लक्ष सहज ओवरीत संचित बसलेल्या त्या तरुणाकडे - गणपतीबुवाकडे गेले - व त्याने मोठ्या आपुलकीने त्याची चौकशी केली व मोरगावला येण्याचे कारणही त्यास विचारले . तेव्हा गणपतीबुवानी आपल्याला येत असलेला तो श्लोक म्हणून दाखविला व गणपतीने आपले दारिद्र्य दूर करावे अशी आपली इच्छा असल्याचे त्या सिद्धपुरुषाला सांगितले. गणपतीबुवांचा तो भोळा भाव पाहून त्या सिद्धपुरुषाला त्यांची दया आली व त्याने गणपती बुवांना लगेच एक उपासना दिली आणि तो म्हणाला,की " मी दिलेल्या मंत्राचे तू एकवीस दिवसात पूरश्चरण कर म्हणजे श्री गजानन कृपेने तुझी इच्छा पूर्ण होईल.!" गणपतीबुवांनी लगेच दुसऱ्याच दिवसापासून पूरश्चरण करण्यास मोठ्या निष्ठेने सुरुवात केली व एकवीस दिवसात ते पूरश्चरण पूर्ण केले. त्यानंतर त्या सिद्धपुरुषाच्या आज्ञेवरून ते मुंबईस गेले. तेथे एके रात्री त्यांच्या स्वप्नात एक मनुष्य येऊन म्हणाला , " उद्या तुझ्या कडे दोन माणसे येतील व जहाजाविषयी प्रश्न विचारतील. त्यांना सांग कि विलायतेहून माल भरून आलेली तुमची जहाजे बुधवारी दुपारी समुद्राच्या किनार्याला येउन लागतील. त्या माणसांकडून तुला जे काही मागायचे असेल ते मागून घे." त्याचवेळी त्या जहाजांच्या मालकांनाही जहाजांबद्दलचे प्रश्न विचारण्यासाठी अनंत ऋषींच्या वाडीत राहणाऱ्या गणपतीबुवांकडे जाण्याचा दृष्टांत झाला व ते त्या वाडीचा शोध घेत घेत दुसर्या दिवशी सकाळीच गणपती बुवांकडे हजर झाले. त्यांना पाहताच गणपतीबुवांनी विचारले, कि " तुमचीच जहाजे बेपत्ता झाली आहेत का ? " तो प्रश्न ऐकून ते व्यापारी चकित झाले.! त्यांनी गणपतीबुवांना सिद्धपुरुष समजून वंदन केले. तेवढ्यात गणपतीबुवा म्हणाले," काळजी करू नका ! येत्या बुधवारी दुपारी तीन वाजता तुमची जहाजे सुरक्षित किनार्याला लागतील. " ते ऐकून जहाज मालकांचा जीव भांड्यात पडला. कारण त्या जहाजात लक्षावधी रुपयांचा माल होता. मग त्यांच्याकडे पाहात गणपतीबुवांनी प्रश्नार्थक मुद्रेने विचारले, " की तुमची जहाजे बुधवारी खरोखरच सुरक्षित परत आली तर श्रीँपुढे काय ठेवाल ? " त्यावर ते मालक म्हणाले, " तुमचे भविष्य खरे ठरले तर आम्ही श्रीँपुढे एक लाख रुपये ठेवू ! " एवढे बोलून ते गणपतीबुवांना वंदन करुन निघून गेले. बुधवारी दुपारपर्यँत त्या दोघांची एकसारखी चुळबुळ सुरु होती; परंतु जहाजे येण्याची लक्षणे दिसेना. ते दोघेही विलक्षण अस्वस्थ झाले; पण तीनच्या सुमारास त्यांची जहाजे खरोखरच किना-याला लागली आणि ते दोघेही अक्षरशः आनंदाने नाचू लागले ! आणि पूर्वी कबूल केल्याप्रमाणे दुस-या दिवशी एक लाख रुपये घेऊन गणपती बुवांकडे आले आणि त्यांनी ते पैसे त्यांच्या पायाशी ठेवले ! अशाप्रकारे, ' मनी इच्छिले मोरया देत आहे ' ही काव्यपंक्ती अक्षरशः खरी ठरली ! गणपतीबुवांनी मोठ्या आनंदाने ते एक लाख रुपये क्षणभर स्वतःच्या छातीशी कवटाळले ; परंतु दुस-याच क्षणी त्यांना विरक्ती निर्माण झाली. त्यांची द्रव्यतृणा पार नाहीशी झाली आणि ते पैसे घेऊन ते तसेच शिरंगावी आले व त्यांनी आपल्या त्या जन्मगावी श्रीगणेशाचे एक अतिशय देखणे मंदिर उभारले व राहिलेले सर्व पैसे दानधर्मात खर्च करुन टाकले ! कालांतराने ग्वाल्हेरच्या शिँदे सरकारांनी गणपतीबुवांची कीर्ती ऐकून प्रतिवर्षी बारा हजार रुपये उत्पन्न देणारी दोन गावे गणपतीबुवांना इनाम म्हणून दिली. असे सांगतात, की गणपतीबुवा जेव्हा स्वर्गवासी झाले त्यावेळी त्यांच्याजवळ चक्क रोख वीस लाख रुपये होते !! मोरयाजवळ गणपतीबुवांनी एकदाच मागितले आणि त्याने त्यांना दिले ते जन्मभरासाठीच . कायमचे . कालांतराने ग्वाल्हेरच्या शिँदे सरकारांनी गणपतीबुवांची कीर्ती ऐकून प्रतिवर्षी बारा हजार रुपये उत्पन्न देणारी दोन गावे गणपतीबुवांना इनाम म्हणून दिली. असे सांगतात, की गणपतीबुवा जेव्हा स्वर्गवासी झाले त्यावेळी त्यांच्याजवळ चक्क रोख वीस लाख रुपये होते !!

शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha

संकलित
Chapters
अश्वत्थामा चिरंजीव आहे का? 1 कल्की अवतार अश्वत्थामा चिरंजीव आहे का? 2 हिमालयावर सिध्दपुरुष आहेत का? 1 हिमालयावर सिध्दपुरुष आहेत का? 2 योगसामर्थ्य 1 योगसामर्थ्य 2 तीर्थमंत्रातील सामर्थ्य ! 1 तीर्थमंत्रातील सामर्थ्य 2 कसबा गणपती इच्छापूर्ती मयुरेश्वर, मोरगाव रुद्राभिषेक भविष्यकथानाची सिद्धी 1 भविष्यकथानाची सिद्धी 2 भविष्यकथानाची सिद्धी 3 शोध अश्वत्थामाचा 3 Naustradamus 1 Naustradamus 2 कोकणेश्वर महादेव लावणी ६४ वी एका अप्सरेच्या मुली नेपाळमध्ये मोठा भूकंप मृत्युनंतर पुन्हा जिवंत झाले जगातील सहा न उलगडलेले रहस्य . चेटकीण प्रथेचा काळा इतिहास संत नामदेव शिव भारतामधील Top 10 मंदिरे दैवी शक्ती पृथ्वीच्या पाठीवर सूर्य ग्रहणामुळे वाचले होते अर्जुनाचे प्राण पुराणांनुसार देवतांचे राजा इंद्र वास्तुपुरुष गुढीपाडवा देवगड-विजयदुर्ग मार्गावर गिर्ये पोस्ट दैवी शक्तीं मित्रांनो खरोखर घडलेली गुढ घटना ......... संतांचा सहवास सध्या दैवी शक्ती ऋण , वैर , हत्या न चुकती कल्पांती।। ।।ॐ।। ओम नम: शिवाय। भारताने लावलेले शोध योगीराज संत सोहिरोबानाथ... महाभारतानुसार द्रौपदी राजा द्रुपदची मुलगी द अंबेर रुम मंदिरात का जावे ? देवपूजा का करावी? या मागचे शास्त्रीय कारण काय? हिंदू धर्म महाभारत एक प्राचीन ग्रंथ तीर्थस्थळाचे नाव महात्मा बसवेश्वर चैत्र शुद्ध नवमी गंगासागर भारतातील ऋषीमुनीं विमानाचा शोध भगवान श्रीकृष्ण महाराष्ट्रात महानुभाव अघोरी कुलइतिहास द्रौपदीला द्रौपदीचे वस्त्रहरण दत्ताची नावे आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव...भाग ४ था . आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग ३ रा.. आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग २ रा.. भाग २ रा ....रुपकुंड श्री रामेश्वर मंदिर. वेंगुर्ला. भारतीय संस्कृती महाराज कोण होते, कोठून आले दैवी किंवा देवता ‘गावपळण!’ गणपती विषयी काळभैरव 13 दिवस भिमसोबत कुस्ती लढणारा .... वाघाला पुजणारं गाव....तोंडवली,मालवण गरुडपुराण प्राणायामातून होते कुंडलिनी जागृती... || गणपती बाप्पा मोरया || अंबरनाथचे पुरातन शिवमंदिर पद्मनाभ स्वामी मंदिर आणि मौल्यवान खजिना ... श्री.सोमनाथ मंदिर (गुजरात) मयंग : आसाम गावाचे नाव :- वालावल मल्हारी मार्तंड खंडोबा डॉ. तुषार यशवंत सावडावकर याचा हा लेख .. दत्तावतारी **** भूतांचे प्रकार **** भाग १- Part - 1 पिशाच्च रुद्राक्ष भाग २ माफ करा वाचकांनो आजचे अनुभव ||विठ्ठलाचे सेवेकरी, आम्ही वारकरी|| चक्र आपण जानता आहात का ? गुरु सामर्थ्य मी तन्वी रेडी नामस्मरण नामसाधनेची येळकोट-येळकोट-येळकोट-येळकोट-जय मल्हार ! १९२१ सालची गोष्ट दिनदर्शिकेप्रमाणे महाभारतातल्या हिमालयीन यती/ हिममानव:- अखंड नामस्मर मनुष्य हा कल्पना विलास तबकड्या बहुधा पाण्यावर ध्यानावस्थेत भगवान पतंजली महाशिवरात्रीच्या शिवभक्तांना शिवमय शुभेछ्या सोमजाई देवीचा इतिहास लावणी ४४ वी