Get it on Google Play
Download on the App Store

बकऱ्याचा मान

हि गोष्ट आपल्यातील एका वाचकाने पाठविली आहे
त्यांचं नाव आणि गाव त्यांनी गुपीत ठेवायला सांघितलं आहे.

नमस्कार
मी **************
माझं गाव नाशिक मधलं आदिवासी पाडा आहे पण मी चेन्नई ला कामाला असतो
सर्वप्रथम मी तुम्हाला माझ्या गावा विषयी तुम्हाला सांगतो
माझं गाव डोंगरावर असून डोंगरांनी आणि जंगलाने चारी बाजूने घेतलेल आहे.
माझ्या गावात जाण्यासाठी आजही डांबरी रस्ते नाहीत तर मुख्य डांबरी रस्ता 5 किलोमीटर वर आहे त्या ठिकाणच्या गावात ST बस येते.
गावात जायला बैलगाडी रोड आहे पण तो हि एवढा खराब आहे की चार चाकी गाडी आजपर्यंत माझ्या गावात पोहोचली नाही, फक्त बाईक जाते.
काही वर्षांपूर्वी एका संस्थेच्या पाठपुरावा मुळे गावात वीज पुरवठा (लाईट) आली तो पर्यंत आमचं गाव अंधारात होत.
माझ्या गाव जस सर्वांच्या स्वप्नातलं गाव असत आणि जस पुस्तकात असत तस साधं आणि निसर्गरम्य वातावरण असलेलं आहे.
सकाळ ची सुरुवात कोंबड्यांच्या ओरडण्याने होते, गावातील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे तर काही प्रमाणात लोक कुकुटपालान,शेळी-मेंढी पालन व दुग्धव्यवसाय करतात.
वर्षभर उत्तम वातावरण असत.
पाण्याचं नियोजन हि चांगलं केलेलं आहे त्यामुळे आमच्या गावाला पाण्याची टंचाई कधीच भासली नाही.
माझ्या गावात जिल्हा परिषद ची 4 थी पर्यंत शाळा आहे त्या नंतरच शिक्षण घ्यायचं झाल्यास 15km लांब जावं लागतं नाहीतर तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या आश्रम शाळेत राहावं लागतं
माझं शिक्षण हि आश्रम शाळेत झालं
माझ्या गावातील मी पहिला इंजिनिअर झालेलं असून मी गावातील उच्चशिक्षित आहे
पूर्वीपेक्षा आता माझ्या गावात शिक्षणाचं महत्व समजलं आहे

माझं लग्न झालं असून मला एक मुलगी आहे
ती जेंव्हा 11 वर्षाची होती तेंव्हाही हि गोष्ट
मी चेन्नई ला कामाला असल्याने आम्ही वर्षातून एकदाच गावी जातो
माझी मुलगी तेथेच इंग्रची माध्यमाच्या शाळेत शिकते
आम्ही फक्त तिच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जातो
एक वर्ष आम्ही गावी गेलो होतो
तेंव्हा जे माज्यासोबत घडलं ते खूपच भयानक होतं
मला जरा त्या दिवसाची आठवण तरी आली तरी अंगावर काटा उभा राहतो
आम्ही नाशिक वरून गावी St ने पोहोचलो
मुख्य रोडवरून माझ्या गावात जाण्यासाठी 5KM चालावे लागते
पण माझ्या पप्पांनी बैलगाडी ची व्यवस्था करून ठेवली होती
ते आमची सकाळ पासून वाट पाहत होते
मग बैलगाडी मधून आम्ही गावी पाहोचलो
माझ्या मुलीला माझं गाव खूप आवडतं
गावातील लहान मुलं-मुली सोबत माझी मुलगी खूप खेळते, फिरते.
गावी असताना एक दिवस माझी मुलगी आणि तिचे मित्र मैत्रिणी करवंद आणि आंबे खायला जंगलात गेले
जंगलात एक ठिकाण आहे त्याला भुताच माळ म्हणतात
त्या ठिकाणी सहजा कोणी जात नाही
पूर्वी गावची लोक त्या ठिकाणी दर वर्षी बोकडाचा मान देत असत पण हळू हळू ती परंपरा बंद झाली
त्या माळावर खूप करवंदाची आणि आंब्याची झाड आहेत.
माझ्या गावातील मुलांना ते माहित होत
सर्व तेथे गेले आणि खूप करवंद आणि आंबे खाल्ले काहींनी तर सोबत हि आणले

आमचं गावी एकत्र कुटुंब पद्धत आहे
सर्व जणांचं जेवण एकत्र तयार केलं जातं
रात्री जेवायला बसलो
लहान बच्चे कंपनी वेगळे एकत्र बसायचे जेवायला
अचानक माझी मुलगी आणि माझ्या काकांच्या मुलाची मुलगी खूप भयानक ओरडायला लागली
आम्ही सर्व डचकलो
त्या दोघींचे डोळे रक्तासारखे लाल झाले होते
आता त्या दोघी रूम मध्ये लोळायला लागल्या जेवणाची ताट तुडवली जात होती
त्या दोघी अचानक पळाल्या आणि गाव मागील जंगलात धावत गेल्या
तेंव्हा गावातील अजून दोन घरातील एक मुलगा आणि मुलगी जंगलात धावत गेले होते
खूप आरडा ओरडा झाला होता
संपूर्ण गाव जमा झाला होता
सर्व विचारत हिते
काय झालं ते सर्वांना सांगावं लागत होत
मी जंगलात जायचं म्हणत होतो तेंव्हा
माझ्या काकांनी सांघितलं हि घटना साधीसुधी नसून भुताची हाय
काकांनी त्यांच्या मुलाला नाथा नावाच्या माणसाला आणायला पाठविले तो भगत होता भूत काढायचा
काकांच्या मुलाने धावत जाऊन त्याला घेऊन आला तो पर्यंत सर्व माझ्या घराच्या समोर जमा झाले होते
घरातील बायका रडत होत्या
कोणाचीच हिम्मत होत नव्हती जंगलात जायची
मग त्या नाथा भागताने माझ्या घरात प्रवेश केला आणि काही मंत्र म्हटले आणि किचन मध्ये जाऊन आंबे एका भांड्यात आणलेआणि हे आंबे कोठून आणले हे विचारले तेंव्हा माझ्या भावाच्या मुलाने सांघितलं कि हे आम्ही जंगलातून आणलेत

भागताने सांघितलं कि हे भुताच्या माळावरील झाडाचे आंबे आहेत
आपल्याला जंगलात जावं लागेल
मग गावातील 20 ते 25 जण निघाले
सोबत कोयते, कुर्हाड, काठी सोबत घेऊन बॅटरी आणि कंदिलाच्या उजेडात जंगलात निघालो
भागताने दोघांना तेथील काही लाकडं गोळा करायला सांगितली
माझं तसं भुतावर विश्वास नव्हता
गावात अंधश्रद्धा वाटायची मला
तरीही मनात भीती निर्माण झाली होती
काहीही झालं तरी मी मुलीचा बाप आहे
जीव गेला तरी बेहत्तर पण माझ्या मुलीला काहीच होऊ देणार नाही
याच निर्णयाने सर्वात पुढे मी होतो
भगत आम्हाला रास्ता दाखवत होता
आम्ही सर्व भुताच्या माळावर येऊन पोहोचलो
आम्हाला भागताने एकत्र राहायला सांघितलं
काही झालं तरी मी सांगेन तेच ऐकायचं अशी सक्त टाकीत दिली
भागताने त्याच पिशवीतून सामान काढलं
लिंबू,मिरची, खूप अगरबत्ती, कुंकू , हळद असं बरंच समान बाहेर काढलं
आणि मंत्र म्हणायला सुरूवात केली
थोड्या वेळाने जंगलातुन खूप भयानक आवाज यायला लागलं
मी आणि बाकीचे बॅटरी ने जंगलातील झाडावर लक्ष ठेऊन होतो
आम्ही आणलेली लाकडं भागताने पेटवायला(जाळायला) सांघितलं
खूप उजेड झाला आणि जंगलात हाहाकार माजला होता
आता सर्व आंब्याची झाड हालायला लागली होती
मुद्याचा म्हणजे काहीच हवा सुटलेली नव्हती व बाकीची झाड तशीच स्थिर होती
झाडांच्या एव्हड्या भयानक आवाजाने वातावरण भयबीत करून सोडणार होत
अचानक कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आला
तसं भागताने पुन्हा सांगितलं
काहीही झालं तरी जागेवरून हालू नका नाहीतर तुमच्या सर्वांच्या जीवाला धोका निर्माण होईल
समोरील आंब्याच्या झाडावरून ओरडण्याचा आवाज येऊ लागला
त्या आंब्याच्या झाडाची पाने सर्व गळून खाली पडली
बॅटरी मारली तर एक मुलगा उलटा लटकलेला होता आणि भयानक ओरडत होता
सर्व घाबरले पण गावातील एक जण म्हणाल हा तर माझा मुलगा आहे
आणि आंब्याच्या दिशेने धावू लागला
गावातील दोघांनी त्याला धरलं
दुसऱ्या फांदीवर माझ्या काकांची मुलगी उलटी लटकलेली होती
आता मी माझ्या मुलीला शोधू लागलो
माझा कंठ आता दाटून आला मी रडायला लागलो होतो
अजून एका झाडाची पाने गळून पडली आणि त्या झाडावरील छोट्या फांदीवर दोन मुली उलट्या लटकून होत्या त्यात एक माझी मुलगी होती
बहुतेक भगतला सर्व समजलं होत
भागताने पुढे जाऊन समोरच्या जागेवरील ठिकाणाला नमसकार केला
आणि मंत्र म्हणत ती जागा साफ केली
ती जागा बहुतेक भुताची होती
तेथे काही दगड होती त्यांना हळद कुंकू लावले
तेंव्हा ते सर्व झाडावरून एखाद्या खारुताई प्रमाणे उतरून खाली आले आणि एकसाथ बोलू लागले
"इथून निघून जा नाहीतर मी ठार कारेन सर्वांना"
त्या सर्वांचा आवाज खूप घोगरा येत होता, त्यांचे डोळे रक्तासारखे लाल झाले होते अंगावर खूप कापल्याच्या जखमा झाल्या होत्या.
भागताने हात जोडून विचारलं काय चुकी झाली का आमच्याकडून
तेंव्हा त्या चौघांनी एकत्रित सांगितलं
कि "या मुलांनी माझ्यावर पाय देऊन माझी विटंबना केली आहे,
आता मी यांना सोडणार नाय."
भागताने जोरात मंत्र म्हणत खूप विनवणी केली
आम्ही तुला मान द्यायला तयार आहोत
उद्या सकाळ होताच तुला बकऱ्याचा मान मिळेल
तेंव्हा ते सर्व मुलं खूप जोरात हसायला लागली आणि बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली
सर्वांनी जाऊन त्या मुलाला आणि मुलींना उचलून गावात आणले
गावात सर्वांना उद्या भुताच्या माळावर यायला सांघितलं
जो येणार नाय त्याच्या घरावर कोप होईल असं भागत म्हणाला
सकाळी सूर्योदय झाला तेंव्हा माझी मुलगी आणि माझ्या काकांच्या मुलाची मुलगी ला शुद्ध आली
त्यांना काहीच माहित नव्हतं
त्यांच्या अंगावर कापल्याच्या व्रण उठल्या होत्या
बहुतेक त्या करवंदाच्या काट्यांनी झाल्या सारख्या वाटत होत्या
सकाळ सकाळ काकांनी गावातून एक बोकड घेऊन आले
गावातील सर्व एकत्र जमली आणि भुताच्या माळावर जाऊन बोकडाचा बळी दिला.
माझ्या मुलीला ते आवडलं नाही आणि मला हि खूप वेगळं वाटत होत ते
पण कालचा प्रकार पाहून मला भुतावर विश्वास निर्माण झाला होता
दुसऱ्या दिवशी सर्व सुरळीत चालू होत
आता त्या भुताच्या ठिकाणी
एक चौथरा बांधून चारही बाजूने कुंपण केलं आहे
जेणेकरून कोणाचा पुन्हा पाय पडायला नको
आता दर वर्षी उन्हाळ्यात बकऱ्याचा मान तेथे द्यावा लागतो, आजही ती प्रथा चालूच आहे.
येणाऱ्या पुढच्या पिढीला हि अंधश्रद्धा वाटणार हे निश्चित आहे पण खर काय होऊ शकत हे फक्त आम्हालाच माहित आहे.

समाप्त...
तुम्हाला हि गोष्ट कशी वाटली नक्की प्रतिक्रिया द्या

आभार:- *************

सर्व वाचकांना नम्र सूचना:-
1. आम्ही अंधश्रद्धा पसरवत नाही,
तर तुमचं निव्वळ मनोरंजन हाच आमचा हेतू आहे.
2. या पेजवरील गोष्ट म्हणजे कोणासोबत घडलेला प्रसंग असतो, ती लिहिणारा हा कुशल लेखक नसतो. वाचताना त्याच्या नजरेने वाचा आणि काहीही कमेंट करताना थोडं नीट विचार करा नाहीतर आपल्या पेजला कोणीच अनुभव पाठवणार नाही.

@#भुताच्या_गोष्टी