Get it on Google Play
Download on the App Store

आधुनिक जग

कधी वेळ मिळाला तर जरुर महाभाराताचे वाचन करा. महाभारतात उल्लेख केल्याप्रमाणे कालियुगाचे वर्णन अगदी तंतोतंत जुळते. कलीयुगात म्हणजेच आधुनिक काळातील भविष्यातील संस्कृतीबद्दल जे काही भाकीत केले गेले होते ते खरे झाले आहे असे दिसेल. परंतु कृपया लक्षात घ्या की ह्या भविष्यवाण्या नाहीत त्या गीताचा एक भाग आहेत.

हे हजारो वर्षांपूर्वी लिहिले होते...! त्यामुळे हा केवळ कल्पनाविलास नव्हेच...!

काही लोक म्हणतात की हा केवळ कल्पनाविलास असणे शक्य आहे कारण लेखकाच्या कल्पनाशक्तीवर हे अवलंबुन असते.

असे ठरवण्यासाठी बरेच मार्ग आणि त्याकाळची एकंदर परिस्थिती काय होती याचा अभ्यास करायला हवा...! 

हरवलेल्या द्वारका शहराचा पुरातत्व पुरावा

 गुजरातमधील द्वारका या प्राचीन पाण्यात बुडलेल्या सागरी पुरातत्व शास्त्राने वैदिक शास्त्रातील विधानांच्या समर्थनार्थ आणखी पुरावे शोधून काढले. महाभारत आणि इतर वैदिक साहित्यात वर्णन केल्याप्रमाणे द्वारका येथे संपूर्ण बुडलेले शहर, भगवान कृष्णाचे प्राचीन बंदराचे शहर, त्याच्या भव्य किल्ल्याच्या भिंती, पायर्‍या, जेट्टी समुद्रात सापडले आहेत.

एक गोष्ट अशी की महाभारताचे समर्थन करणारे त्यांच्याद्वारे केलेले हे दावे खर्‍या ऐतिहासिक घटनांचे वर्णन करतात.

महाभारत आणि वास्तविक स्थाने

 उत्तर भारतातील पस्तीस पेक्षा जास्त ठिकाणांवर पुरातत्व खात्याला पुरावे मिळाले आहेत. महाभारतात वर्णन केलेल्या प्राचीन शहरांचे काही भग्न अवशेष सापडले आहेत. हे अवशेष महाभारत काळातील शहरे म्हणून त्यांची ओळखले जात आहेत.

या उत्खननामध्ये तांबे, भांडी, लोखंड, सील, सोने व चांदीचे दागिने, टेराकोटाची तबके, रंगकाम आणि नक्षीकाम केलेले राखाडी मातीची भांडी ही सर्व सापडले आहे.  या कलाकृतींचे वैज्ञानिकदृष्ट्या कार्बन डेटिंग म्हणजेच कार्बन कालमापन पद्धतीने भारतीय पुरातन काळच्या आर्यांच्या आक्रमणाच्या वेळेशी संबंधित आहे.

महाभारतात नमूद केलेली सर्व ठिकाणे वास्तविक स्थाने आहेत. अजूनही त्याच नावाने ती शहरे अस्तित्त्वात आहेत.  उदाहरणार्थ, हस्तिनापूर उत्तर प्रदेशात असून, हस्तिनापुरात महाभारताचे पुष्कळ पुरावे आहेत. इंद्रप्रस्थ म्हणजे सध्याची दिल्ली आहे. द्वारका गुजरात किनारपट्टीवर आहे.

कुरूक्षेत्र जिथे महाभारतातील युद्ध खरोखर घडले ते दिल्लीच्या अगदी जवळच्या भागात म्हणजे सध्याच्या हरियाणामध्ये आहे. विशेष म्हणजे हे केवळ भारतापुरते मर्यादित नाही. केकया राज्य आजच्या पाकिस्तानात आहे, आजच्या पाकिस्तानमध्ये मद्रा राज्य आहे.  गांधार राज्य आजच्या अफगाणिस्तानात आहे.  कंबोजस राज्य आजच्या इराणमध्ये आहे. परम कंबोजा राज्य आजच्या ताजिकिस्तानमध्ये आहे.

अलीकडेच संशोधकांना गुजरात जवळच्या समुद्राखाली द्वारका शहर सापडले आहे. महाभारतातील शहरे सध्याच्या भारतपुरती मर्यादीत नाहीत कारण महाभारताने भारतीय उपखंडाचा भारत असा उल्लेख केला