Get it on Google Play
Download on the App Store

पिंडी तेच ब्रम्हांडी

एका गावात एक ढोंगी बाबा राहत होता. तो लोकांना प्रवचन देत असे. तो फक्त एकच गोष्ट सांगायचा, 'कोणावरही रागावू नका.'

एके दिवशी एक महात्मा गावातून मार्गक्रमण करता करता तिकडे उतरले. लोकांकडून बाबांची कीर्ती ऐकून ते स्वतः त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले, "बाबा, मला असे सोपे सूत्र सांगा, ज्याद्वारे मी नेहमी आनंदी राहीन."

बाबा म्हणाले, "फक्त एक काम करा, कोणावरही रागावू नका."

महात्म्याने थोडे कमी ऐकू आल्याचे नाटक केले आणि पुन्हा विचारले, "तू काय बोललास? मी ऐकले नाही."

बाबा थोडा जोर देऊन म्हणाले, "रागावू नका! '

महात्मा पुन्हा म्हणाले, "मला आणखी एकदा सांगा."

पुन्हा कमी ऐकू आल्याचे नाटक करून, त्या महात्म्याने चौथ्यांदा विचारले, तेव्हा बाबा संतापले आणि काठी उचलून महात्म्याच्या डोक्यावर मारली.

मग महात्मा हसले. म्हणाले , 'जर राग न येणे हा तुमचाच जीवनातील शांती आणि यशाचा मंत्र आहे, मग तुम्ही माझ्यावर का रागावलात? आधी तुम्ही स्वतः रागापासून मुक्त व्हा मग इतरांना शिकवा.'

ढोंगी बाबाला समजले की त्याच्या समोर कोणी सामान्य माणूस उभा नसून एक परिपूर्ण महात्मा आहे त्याने त्यांचे पाय धरले. ते महात्मा होते भगवान गौतम बुद्ध!