Get it on Google Play
Download on the App Store

10 एकनाथ महाराज

एकनाथ महाराजांची नेहमी गंगेवर म्हणजेच गोदावरी नदीवर जाऊन घाटावर स्नान करण्याची  पद्धत होती .स्नान करून गडू गंगेच्या पाण्याने भरून घेऊन  ते ओलेत्याने घरी येत असत व नंतर  देवपूजा करीत. महाराज खूप शांत आहेत कधीही कोणावरही रागावत नाहीत असा त्यांचा लौकिक होता.हे गावातील एका  टवाळाला कोणीतरी सांगितले त्याने आपल्या मित्रांबरोबर पैज लावली की मी महाराजांना रागावून दाखवीन. दुसऱ्या दिवशी पानाचे साहित्य घेऊन घाटावर महाराज  जिथून येत जात असत त्या ठिकाणी तो जाऊन बसला. महाराज येताच त्याने त्यांच्या अंगावर एक पिंक टाकली .महाराज काहीही न बोलता पुन्हा गंगेवर गेले व स्नान करून पुन्हा त्याच वाटेने आले.त्यांने पुन्हा पिंक टाकली.महाराज पुन्हा  अंघोळीसाठी घाटावर गेले.अशा प्रकारे अठरा वीस वेळा पुन्हा पुन्हा तो पिंक टाकत होता तरीही महाराज रागावले नाहीत हे पाहून शेवटी त्याला स्वतःचीच लज्जा वाटून त्याने महाराजांचे पाय धरले .महाराजांना याबद्दल विचारता ते म्हणाले की . मला त्याचा राग येत नाही त्याला मी काय करणार ?  महाराजांनी त्याला क्षमा करून आपला शिष्य म्हणून स्वीकार केला.ही घटना सांगताना घाटावरील लोक ,परगावातून स्नानासाठी  आलेले लोक ,त्यांचे शिष्य,  असल्यास शत्रू, गावातील स्नेही ,त्यांच्या घरची मंडळी ,इत्यादी अनेक जण या घटनेचे वेगवेगळे वर्णन करतील उदाहरणार्थ

१---बाबा गुंडाला घाबरला व तो त्यामुळे पुन्हा पुन्हा अंघोळ करीत राहिला .

२----केवढा महात्मा शांतीचा पुतळा जणू केवढा थोर

३---.कोण हा बाबा केवढे बावळट ध्यान  

४---- उगीच त्याची मिजास चालू दिली .त्याला धरून कानाखाली एक आवाज काढायला पाहिजे होता.

५--केवढा हा उद्धटपणा आम्हाला नुसती हाक मारली असती तरी त्याला बदडून काढला असता .-वगेरे वगेरे ज्याच्या त्याच्या धारणेप्रमाणे जो तो त्या घटनेचे वर्णन करील .

क्रिया एकच असली तरी ज्याच्या त्याच्या धारणे प्रमाणे संस्काराप्रमाणे विचाराप्रमाणे प्रतिक्रिया निरनिराळय़ा असतात. या सर्वाची जाण आली म्हणजे अापण घाईघाईने निष्कर्ष काढण्याचे सोडून देतो .कोणत्याही घटनेवरील आपली प्रतिक्रिया आपल्या संस्काराप्रमाणे म्हणजेच धारणे प्रमाणे आहे हे लक्षात  येऊ लागते .त्यातून आपोआपच अंतर्मुखता येते. आपण कसे आहोत हे लक्षात येऊ लागते .आपोआपच निवड रहित जागृतता अस्तित्वात  येते. त्यालाच साक्षीत्व असेही काही जण म्हणतात . घटनेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो . घटने बरोबर आपण वहावत जात नाही .त्याच्या निरनिराळ्या लोकांच्या वर्णनाबरोबर वाहावत जात नाही.
२१/४/२०१८©  प्रभाकर  पटवर्धन 

विचारतरंग

प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com
Chapters
1 अनाग्रह योग  2 अपेक्षा 3 अहंकार (निरहंकार) 4 आनंदाची गुरुकिल्ली  5 आपण कशाच्या शोधात आहोत ? 6 आपण कसे ऐकतो व कसे ऐकले पाहिजे 7 आपण कुठे असतो ? 8 एक होता ससा व एक होते कासव 9 साधू 10 एकनाथ महाराज 11 कंटाळा 12 क्रोध 13 क्षणभंगुर 14 खरा बलवान कोण 15 खरे स्वातंत्र्य 16 गुरूची आवश्यकता आहे काय 17 चक्रवर्ती 18 जादूचा चेंडू 19 जीवनाची अपरिहार्यता 20 ज्ञात व अज्ञात 21 ज्ञानसागर 22 टीका 23 तुझे रूप चित्ती राहो तुझे मुखी नाम 24 तू माझा सांगाती 25 दिवा स्वप्न व कठोर परिश्रम 26 दुःख क्लेश इत्यादी 27 दृष्टिकोन - काका कालेलकर 28 देवदास 29 देैव व प्रयत्न 30 द्वेष मत्सर असूया राग इत्यादी विषयी- 31 धर्म 32 धारणा 34 नार्सिसस 35 निरहंकारी शंकराचार्य 36 परमेश्वर 37 पोकळी 38 प्रतिक्रिया 39 प्रार्थना एकाग्रता व ध्यान 40 प्रेम 41 फूटपटया 42 बदल 43 बदला बद्दल 44 बहिर्मन व अंतर्मन 45 बोधकथा 46 भगवान 47 भीति 48 भूतकथा 49 मानसिक गोंधळा विषयी 50 मी कोण? 51 मृत्यूची भीती 52 मोह व भीति 53 राष्ट्राभिमान 54 रिकामपणाची बडबड 55 विश्वास 56 शरण जाणे 57 शांततेचे महत्त्व (आजोबा व त्यांचा नातू ) 58 शिक्षण ज्ञान व सत्य 59 शिस्त 60 श्रद्धा 61 संकट 62 संत उमर आणि भटका माणूस 63 सत्य व असत्य 64 संबंधमयता 65 समज व समंजसपणा 66 समर्थन ६७ समस्या ६८ साधू व विंचू ६९ सुख व दुःख ७० स्मरण ७१ स्वनिरीक्षण व जागृतता ७२ स्वर्ग आणि नरक ७३ स्वशॊध ७४ स्वावलंबन ७५ हिमनग ७६ कलियुग ७७ दिव्य दृष्टी ७८ काळोख ७९ मीचे दृढीकरण