Get it on Google Play
Download on the App Store

56 शरण जाणे


प्रत्येक धर्मामध्ये पंथांमध्ये शरण जाणे ही कल्पना आहे .बाबा सांगतात मला  शरण या. धर्मगुरू सांगतात त्याला शरण जा.मग तो अल्ला बुद्ध  ख्रिस्त राम विठ्ठल किंवा आणखी कुणी असो .जात पंथ इत्यादींचे प्रमुख, आम्ही सांगतो तेच खरे अंतिम असा आग्रह धरतात .जात पंथ इत्यादी जो काही विचार करावयाचा तो आम्ही व आमच्या पूर्वसुरींनी  केलेला आहे .तुम्ही फक्त आचरण करा तुमचे कल्याण होईल असे सांगतात .थोडक्यात का व कसे असे प्रश्न न विचारता जी काही चौकट पूर्वसुरींनी निश्चित केलेली आहे त्याप्रमाणे आचरण करा असे सांगतात.सर्व धर्मांमध्ये अंतिम सत्य श्रेष्ठ शक्ती ही कल्पना आहे .

संपूर्ण शरण जाण्यामुळे ते सत्य तुम्हाला प्राप्त होईल असा विश्वास दिला जातो .त्याचप्रमाणे अंतिम सत्य हे अनाम निराकार अनंत अवर्णनीय आहे असेही सांगितले जाते .एवढ्याच वर्णनावर न थांबता प्रत्येकजण त्याच्या त्याच्या  कल्पनेप्रमाणे त्याचे वर्णन करीत असतो .अशा प्रकारे धार्मिक ग्रंथांचा एक समुद्रच निर्माण झाला आहे असे म्हणता येईल . जे वर्णनातीत आहे त्याचे वर्णन कां बरे करतात ?ते मला समजलेले नाही .भाषा ही भावना व विचार यांचे संवहन करण्यासाठी निर्माण झाली . गणित भूगोल  भौतिक शास्त्रे यांच्यासाठी भाषा अर्थातच आवश्यक आहे .

वस्तुस्थितीचे वर्णन करण्यासाठी उदाहरणार्थ किती वाजले तो झोपी गेला आहे किंवा बाहेर गेला आहे यासाठी भाषा आवश्यक आहे .परंतु जेव्हा भावना कल्पना परमेश्वर इत्यादींच्या वर्णनासाठी भाषा वापरली जाते त्यावेळी त्या भाषेमुळे शब्द रचनेमुळे योग्य समज निर्माण होती का ?असा माझा प्रश्न आहे .एखाद्या भावनेला जेव्हा आपण चिठ्ठी लावतो म्हणजे ती शब्दातून व्यक्त करतो तेव्हां ती संपूर्णपणे सर्व छटांसह आपल्यापर्यंत पोचते का ?असा माझा   प्रश्न आहे.गीता सारख्या ग्रंथांवर जर लोकांनी केलेल्या अनेक टीका म्हणजेच  निरनिराळ्या लोकांनी लावलेले त्याचे अर्थ लक्षात घेतले तर  मी काय म्हणतो ते लक्षात येईल .एकाच ग्रंथांचे भक्तीपर कर्मपर योगपर ज्ञानपर असे अनेक अर्थ लावले गेले.एवढेच नव्हे तर भक्तीपर वगैरे अर्थ लावणाऱ्यांनीही निरनिराळ्या प्रकारची विविध ग्रंथसंपदा  निर्माण केली .एकाच शब्दाचे एकाच वाक्याचे एकाच लेखाचे प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार आकलनानुसार निरनिराळे अर्थ लावतो. कदाचित सांगणाऱ्याला या सर्वांपेक्षाही वेगळा अर्थ अभिप्रेत नसेलच असे नाही !भावनांना चिठ्ठी  लावलीच पाहिजे का चिठ्ठीशिवाय भावना आपल्याला कळू शकणार नाहीत का ?एखाद्या चाकोरीचे  एखाद्या विशिष्ट आचरणाचे पालन करून कदाचित आपल्याला काही काळ किंवा जन्मभर समाधान लाभेल

.पण सत्य प्रकट होईल का ?शरण जाण्याने तुम्ही ज्याची इच्छा केली ते कदाचित तुम्हाला मिळेलही पण ते सत्य असेल का ?मी काहीतरी आहे व मला आणखी  वेगळे काहीतरी बनावयाचे आहे या पेक्षा जे काही आहे त्याला तसेच सामोरे का जाऊ नये ?ज्या ज्या वेळी जी जी भावना असेल त्या त्या वेळी त्या त्या भावनेत आपण का राहू नये ? आपल्याला का बदलावयाचे असते ?शब्दीकरणा शिवाय त्या त्या भावनेत राहून आपल्याला ती भावना यथार्थतेने समजेल व त्यातूनच सत्य प्रगट होईल . जे आहे ते आहे .काट्याने काटा काढावा त्याप्रमाणे विचारानेच  विचार नष्ट  होईल का ?साध्या सोप्या गोष्टी अापण विशेष कठीण करून ठेवल्या आहेत का ?
©प्रभाकर  पटवर्धन 
 

विचारतरंग

प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com
Chapters
1 अनाग्रह योग  2 अपेक्षा 3 अहंकार (निरहंकार) 4 आनंदाची गुरुकिल्ली  5 आपण कशाच्या शोधात आहोत ? 6 आपण कसे ऐकतो व कसे ऐकले पाहिजे 7 आपण कुठे असतो ? 8 एक होता ससा व एक होते कासव 9 साधू 10 एकनाथ महाराज 11 कंटाळा 12 क्रोध 13 क्षणभंगुर 14 खरा बलवान कोण 15 खरे स्वातंत्र्य 16 गुरूची आवश्यकता आहे काय 17 चक्रवर्ती 18 जादूचा चेंडू 19 जीवनाची अपरिहार्यता 20 ज्ञात व अज्ञात 21 ज्ञानसागर 22 टीका 23 तुझे रूप चित्ती राहो तुझे मुखी नाम 24 तू माझा सांगाती 25 दिवा स्वप्न व कठोर परिश्रम 26 दुःख क्लेश इत्यादी 27 दृष्टिकोन - काका कालेलकर 28 देवदास 29 देैव व प्रयत्न 30 द्वेष मत्सर असूया राग इत्यादी विषयी- 31 धर्म 32 धारणा 34 नार्सिसस 35 निरहंकारी शंकराचार्य 36 परमेश्वर 37 पोकळी 38 प्रतिक्रिया 39 प्रार्थना एकाग्रता व ध्यान 40 प्रेम 41 फूटपटया 42 बदल 43 बदला बद्दल 44 बहिर्मन व अंतर्मन 45 बोधकथा 46 भगवान 47 भीति 48 भूतकथा 49 मानसिक गोंधळा विषयी 50 मी कोण? 51 मृत्यूची भीती 52 मोह व भीति 53 राष्ट्राभिमान 54 रिकामपणाची बडबड 55 विश्वास 56 शरण जाणे 57 शांततेचे महत्त्व (आजोबा व त्यांचा नातू ) 58 शिक्षण ज्ञान व सत्य 59 शिस्त 60 श्रद्धा 61 संकट 62 संत उमर आणि भटका माणूस 63 सत्य व असत्य 64 संबंधमयता 65 समज व समंजसपणा 66 समर्थन ६७ समस्या ६८ साधू व विंचू ६९ सुख व दुःख ७० स्मरण ७१ स्वनिरीक्षण व जागृतता ७२ स्वर्ग आणि नरक ७३ स्वशॊध ७४ स्वावलंबन ७५ हिमनग ७६ कलियुग ७७ दिव्य दृष्टी ७८ काळोख ७९ मीचे दृढीकरण