Get it on Google Play
Download on the App Store

54 रिकामपणाची बडबड


हल्ली सर्वत्र अंतर्मुखतेपेक्षा बहिर्मुखता वाढलेली आढळून येते .मनुष्याला वेळ घालवण्यासाठी उपलब्ध असलेल्या साधनांची संख्या भरमसाठ वाढलेली आहे .टीव्हीचे अनेक चॅनेल्स त्यांमध्ये न्यूज चॅनेल्स वेगवेगळ्या सीरियल्स असंख्य वर्तमानपत्रे त्याशिवाय निरनिराळ्या राजकीय पुढाऱयांच्या मुलाखती व त्यांची भाषणे मोबाईल व त्यावरचे व्हॉट्सअॅप फेसबुक ट्विटर यासारखी अनेक अॅप्स ,इंटरनेट त्यात उपलब्ध असलेला खजिना व त्यावरचे मुक्त सर्चिंग अनेक खेळ व त्यावरच्या चर्चा यामुळे अनेक विषयांवरची अनेक मते कानावर सारखी आदळत असतात .मनुष्याला पूर्वीहीआपण ज्ञान संपन्न व माहितीपूर्ण आहो असे वाटत असे व आता तर प्रश्नच नाही.
     राजकारण समाजकारण अर्थकारण कौटुंबिक प्रश्न इत्यादी प्रत्येक गोष्टीवर आपली मते अत्यंत ठामपणे मांडली जातात .वादाला सुरुवात होते. मी बरोबर दुसरा चूक असा एकूण अविर्भाव असतो .त्याचप्रमाणे मोदींनी काय केले पाहिजे राहुल कसा चुकीचा आहे किंवा याच्या उलट ट्रम्प ने काय केले पाहिजे अशा प्रकारच्या सल्ल्यांना व वादाना मी रिकामपणची बडबड असे म्हणत आहे .आपल्यालाच सर्व कळते  आपणच  ज्ञानसंपन्न आहोत अशा विश्वासामुळे आपली संवेदनशीलता हरवते. दुसरा काय म्हणत आहे हे आपण समजू शकत नाही.आपण बहिरे नसूनही बहिरे होतो. दुसऱ्याचे बोलणे आपल्या मनावर आदळते परंतु आपण आपल्याच मनातून निर्माण झालेल्या संवेदना अनुभवीत असतो अशा तर्‍हेच्या बडबडीमुळे वृत्तीमुळे दुसरा काय म्हणत आहे हे आपल्याला कधीच कळू शकत नाही .अश्या बडबडीमुळे सर्वत्र कोलाहल भरून राहिलेला आहे सर्वच इतरांना शहाणपण शिकवत आहेत असे वाटू लागते.
जर आपल्याला दुसऱ्याला समजून घ्यावयाचे असेल म्हणजेच खऱ्या अर्थाने ऐकावयाचे असेल तर  प्रथम अापण स्वतःला समजून घेतले पाहिजे .आपण स्वतःला समजून घेतले नाही तर दुसऱ्याला आपण कधीच समजू शकणार नाही .यासाठी अंतर्मुख झाले पाहिजे दिवसातून काही वेळ स्वस्थ बसून मनाचे निरीक्षण साक्षीत्व केले पाहिजे .अश्या जागृतीतून मनाचे गूढ व्यापार कळू लागतील .दुसरा बोलत असताना आत तरंग कसे उठ तात व ते का उठतात हे कळू लागेल. आपल्या धारणेतून हे तरंग उठत आहेत असे लक्षात येईल .स्वाभाविक दुसरा बोलत असताना जागृततेमुळे आपली धारणा लक्षात येऊ लागेल .आपला दुसऱ्याच्या  बोलण्याला विरोध किंवा संमती ,ठामपणे मते मांडणे इत्यादी गोष्टी  थांबतील .रिकामपणच्या बडबडीमुळे ज्ञानसंपन्नता वाढते लोक जास्त शहाणे होतात असे मला वाटत नाही.  आपली समज उलट कमी होते असे मला वाटते. सर्वत्र कोलाहल माजलेला आहे .कुणीच कुणाला खऱ्या अर्थाने समजून घेत नाही .प्रथम स्वतःला समजून घ्या म्हणजे जगालाही तुम्ही समजू शकाल.
   २१/५/२०१८ ©प्रभाकर  पटवर्धन 
 

विचारतरंग

प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com
Chapters
1 अनाग्रह योग  2 अपेक्षा 3 अहंकार (निरहंकार) 4 आनंदाची गुरुकिल्ली  5 आपण कशाच्या शोधात आहोत ? 6 आपण कसे ऐकतो व कसे ऐकले पाहिजे 7 आपण कुठे असतो ? 8 एक होता ससा व एक होते कासव 9 साधू 10 एकनाथ महाराज 11 कंटाळा 12 क्रोध 13 क्षणभंगुर 14 खरा बलवान कोण 15 खरे स्वातंत्र्य 16 गुरूची आवश्यकता आहे काय 17 चक्रवर्ती 18 जादूचा चेंडू 19 जीवनाची अपरिहार्यता 20 ज्ञात व अज्ञात 21 ज्ञानसागर 22 टीका 23 तुझे रूप चित्ती राहो तुझे मुखी नाम 24 तू माझा सांगाती 25 दिवा स्वप्न व कठोर परिश्रम 26 दुःख क्लेश इत्यादी 27 दृष्टिकोन - काका कालेलकर 28 देवदास 29 देैव व प्रयत्न 30 द्वेष मत्सर असूया राग इत्यादी विषयी- 31 धर्म 32 धारणा 34 नार्सिसस 35 निरहंकारी शंकराचार्य 36 परमेश्वर 37 पोकळी 38 प्रतिक्रिया 39 प्रार्थना एकाग्रता व ध्यान 40 प्रेम 41 फूटपटया 42 बदल 43 बदला बद्दल 44 बहिर्मन व अंतर्मन 45 बोधकथा 46 भगवान 47 भीति 48 भूतकथा 49 मानसिक गोंधळा विषयी 50 मी कोण? 51 मृत्यूची भीती 52 मोह व भीति 53 राष्ट्राभिमान 54 रिकामपणाची बडबड 55 विश्वास 56 शरण जाणे 57 शांततेचे महत्त्व (आजोबा व त्यांचा नातू ) 58 शिक्षण ज्ञान व सत्य 59 शिस्त 60 श्रद्धा 61 संकट 62 संत उमर आणि भटका माणूस 63 सत्य व असत्य 64 संबंधमयता 65 समज व समंजसपणा 66 समर्थन ६७ समस्या ६८ साधू व विंचू ६९ सुख व दुःख ७० स्मरण ७१ स्वनिरीक्षण व जागृतता ७२ स्वर्ग आणि नरक ७३ स्वशॊध ७४ स्वावलंबन ७५ हिमनग ७६ कलियुग ७७ दिव्य दृष्टी ७८ काळोख ७९ मीचे दृढीकरण