Get it on Google Play
Download on the App Store

51 मृत्यूची भीती


आपल्याला मृत्यूची भीती का वाटते ?जे माहित आहे त्याबद्दल भीती वाटणे स्वाभाविक आहे उदाहरणार्थ पाण्याची भीती कारण आपण बुडू आणि मरू जंगलाची भीती कारण वन्य श्वापदे आपल्यावर हल्ला करून ठार मारतील. झाडावर चढण्याची ,प्रवास करण्याची भीती कारण आपण पडलो तर मरू.इत्यादी परंतु तरीही जे आपल्याला माहीतच नाही त्याबद्दल भीती का वाटते ?
एखादा म्हणेल की मृत्यूनंतर नरक आहे ठीक भूत योनी आहे ठीक पुनर्जन्म आहे व तो  ,हाल अपेष्टा किंवा अन्य योनी यांमध्ये येईल ,परंतु नरक भूत याोनी पुनर्जन्म इत्यादी निश्चितपणे कोणी पहिला आहे का ?खात्री देता येईल का?मृत्यूनंतर स्वर्ग चांगला पुनर्जन्म इत्यादी गोष्टीही सांगितलेल्या आहेत . प्रत्यक्षात आपल्याला काहीच माहिती नाही हे कबूल करणे भाग आहे .जी माहिती आहे ती फक्त सांगोवांगी व कल्पनेतून निर्माण झालेली आहे .जे गेले ते कधी पुन्हा सांगावयाला परत आले नाहीत जे आहे ते जरी काही सांगत असले तरी ते सत्य सांगत आहेत असा आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल 

जर असे आहे तर पहिला प्रश्न पुन्हा शिल्लक राहतो की आपल्याला मृत्यूची भीती का वाटते?त्याबद्दल आपल्याला विचार करावयाचा आहे .जे आपल्याला माहित आहे ते सोडून जाण्याची भीती म्हणजे मृत्यूची भीती होय .शरीर मुले- बाळे नातेवाईक चल अचल संपत्ती इत्यादी  हे सर्व सोडून जाण्याची भीती  म्हणजेच अज्ञाताची भीती नसून ती जे आहे ते सोडण्याची भीती वाटते .
जे माहित आहे त्याची भीती वाटेल परंतु जे माहीतच नाही त्याची भीती कशी वाटेल ?मृत्यूनंतर जे काही आहे त्याचा एक आराखडा कल्पना  त्यांची भीती वाटणे स्वाभाविक आहे परंतु भीती वस्तुस्थिती पण काल्पनिक गोष्टींबद्दल भीती हे वास्तव .
प्रांजळपणे पाहिले तर जे आहे ते सोडून जाण्याची भीती म्हणजेच मृत्यूची भीती असे मान्य  करण्याला अडचण नसावी कंटाळा आला रे आता बाबा .किती दिवस इथे आता मला ठेवतोस घेऊन जा रे लवकर .असे म्हातारी माणसे म्हणत असली तरी प्रत्यक्षात चर अचर जड सूक्ष्म वस्तूंमध्ये असलेले बंध सुटत नाहीत हेच खरे .हे बंद सुटण्याची भीती म्हणजेच मृत्यूची भीती 
मृत्यूची भीती म्हणजे मी नष्ट होण्याची भीती म्हणजेच  माझे असलेले सर्व संबंध सुटण्याची भीती होय  भीती असू शकते पण अज्ञाताबद्दल नाही  
मी मृत्यूनंतर जीवन आहे की नाही याबद्दल बोलत नाही ते असेल किवा नसेल त्याचा विचार आत्ता अप्रस्तुत आहे मी फक्त भीती का वाटते कसली वाटते याबद्दल विचार मांडत आहे जीवन मृत्यू इत्यादी गोष्टींकडे स्वच्छपणे सरळपणे साधेपणाने पाहिले पाहिजे बऱ्याच वेळा निरनिराळ्या गोष्टींकडे  अापण अत्यंत गुंतागुंतीचा दृष्टिकोन ठेवून पाहात असतो .म्हणूनच ज्यांंचा दृष्टीकोन साधा सरळ असतो स्वच्छ असतो अशा लोकांबद्दल आपल्याला आदर वाटतो उदाहरणात टांँलस्टांँय टागोर महात्मा गांधी जे कृष्णमूर्ती इत्यादि      
२५/४/२०१८. प्रभाकर  पटवर्धन 

विचारतरंग

प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com
Chapters
1 अनाग्रह योग  2 अपेक्षा 3 अहंकार (निरहंकार) 4 आनंदाची गुरुकिल्ली  5 आपण कशाच्या शोधात आहोत ? 6 आपण कसे ऐकतो व कसे ऐकले पाहिजे 7 आपण कुठे असतो ? 8 एक होता ससा व एक होते कासव 9 साधू 10 एकनाथ महाराज 11 कंटाळा 12 क्रोध 13 क्षणभंगुर 14 खरा बलवान कोण 15 खरे स्वातंत्र्य 16 गुरूची आवश्यकता आहे काय 17 चक्रवर्ती 18 जादूचा चेंडू 19 जीवनाची अपरिहार्यता 20 ज्ञात व अज्ञात 21 ज्ञानसागर 22 टीका 23 तुझे रूप चित्ती राहो तुझे मुखी नाम 24 तू माझा सांगाती 25 दिवा स्वप्न व कठोर परिश्रम 26 दुःख क्लेश इत्यादी 27 दृष्टिकोन - काका कालेलकर 28 देवदास 29 देैव व प्रयत्न 30 द्वेष मत्सर असूया राग इत्यादी विषयी- 31 धर्म 32 धारणा 34 नार्सिसस 35 निरहंकारी शंकराचार्य 36 परमेश्वर 37 पोकळी 38 प्रतिक्रिया 39 प्रार्थना एकाग्रता व ध्यान 40 प्रेम 41 फूटपटया 42 बदल 43 बदला बद्दल 44 बहिर्मन व अंतर्मन 45 बोधकथा 46 भगवान 47 भीति 48 भूतकथा 49 मानसिक गोंधळा विषयी 50 मी कोण? 51 मृत्यूची भीती 52 मोह व भीति 53 राष्ट्राभिमान 54 रिकामपणाची बडबड 55 विश्वास 56 शरण जाणे 57 शांततेचे महत्त्व (आजोबा व त्यांचा नातू ) 58 शिक्षण ज्ञान व सत्य 59 शिस्त 60 श्रद्धा 61 संकट 62 संत उमर आणि भटका माणूस 63 सत्य व असत्य 64 संबंधमयता 65 समज व समंजसपणा 66 समर्थन ६७ समस्या ६८ साधू व विंचू ६९ सुख व दुःख ७० स्मरण ७१ स्वनिरीक्षण व जागृतता ७२ स्वर्ग आणि नरक ७३ स्वशॊध ७४ स्वावलंबन ७५ हिमनग ७६ कलियुग ७७ दिव्य दृष्टी ७८ काळोख ७९ मीचे दृढीकरण